Pages

Pages

Thursday, December 31, 2020

शूरवीरांना मानाची वंदना

शूरवीर ते होते कणखर

संख्या त्यांची होती छोटी

जिंकली होती त्यांनी जिद्दीने

मानाची ती लढाई मोठी


आत्मसन्मानाची लढाई

लढली होती त्या वीरांनी

नव्या पर्वाची सुरूवात जाहली

होती त्यांच्या बलिदानानी


प्राणपणाने लढले होते

झुगारूनी सार्‍या बंधांना

त्यामुळेच बाबांनी हो दिली

       त्यांना मानाची ती वंदना...!!!

✒ K. Satish







No comments:

Post a Comment