असंख्य प्राणी अवतरले
विश्वामध्ये स्थिरावले,
मोहमायेच्या दुष्टचक्राने
नकळत त्यांना खुणावले
कुणी धनाचा, कुणी तनाचा
कुणी खाण्याचा, मोह बाळगला,
मनुष्य प्राणी असा निराळा
स्वार्थ ज्यामध्ये अति बळावला
मौजमजा अन् थाटापायी
पैसा अन् व्यभिचारापायी,
चोरी करूनी, जीव घेऊनी
वाममार्गाला नकळत जाई
नाते गोते क्षुल्लक झाले
पैशाला खूप महत्त्व आले,
प्राॅपर्टीच्या वादापायी
कित्येक नाती संपून गेले
समाधानी ठेवून मनाला
ध्यास नसावा स्वार्थाचा,
जन्म मिळाला पृथ्वीतलावर
आनंद घ्यावा जगण्याचा.....
✒ K. Satish

No comments:
Post a Comment